Tuesday 25 July 2023

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक मनमोहक मंदिर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक मनमोहक मंदिर  

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, खेड तालुक्यामधील चोरवणे या गावामधील, श्री देव नागेश्ववरच्या पायथ्याशी असलेले हे अतिशय मनमोहक असे 'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर'... 

चिपळूण पासून साधारण ३३ की. मी. असलेले हे सुंदर गाव. बहादूर शेखचा पूल क्रॉस केल्यावर कळंबस्ते फाट्यावरून आत जाताना निसर्गाचं सुंदर दर्शन घडायला सुरुवात होते. नजर जाईल तिकडे हिरवं गार दृश्य. सुरुवातीची काही दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली, पण जस-जसे पुढे गेलो तसं मोबाईल बाजूला ठेवून तो निसर्ग डोळ्यात भरून घेण्याची इच्छा झाली. ती दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याची नाही तर प्रत्यक्षात अनुभवण्याची होती. काहीवेळ शूट करता-करता ते सगळं पहायचं, अनुभवयचं राहूनच जातं, नाही का..?

हिरवा शालू पांघरलेले डोंगर, त्या डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे धबधबे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी हिरवीगार शेती, त्या शेतात काम करणारे शेतकरी, चरायला सोडलेली गुरं, कौलारू घरं, कधी रिमझिम तर कधी जोरदार पडणारा पाऊस, खाली आलेले ढग हे दृश्य खूपच मनमोहक होत. जसं जसे चोरवणे गाव जवळ येत होतं, तसं-तसं सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यातून वाहणारे पांढरे-शुभ्र, खळखळ आवाज करत जाणारे पाणी मन वेधून घेत होते. हेच पाणी पुढे जाऊन चिपळूण शहरात वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीला येऊन मिळतं, म्हणजे यांच कडे-कपाऱ्यांतून या नदीचा उगम झाला आहे असे म्हणू शकतो. 

'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर' असंच निसर्गाच्या कुशीत वसले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास आम्ही या मंदिराच्या जवळ पोहोचलो आणि  देवळात चालू असलेल्या आरतीचा आवाज आमच्या कानावर पडू लागला आणि मंदिर पहाण्याची आमची उत्सुकता अजूनचं वाढू लागली. अखेरीस एक ते सव्वा तासाचा प्रवास करून आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो आणि काळ्या पाषाणात बांधलेलं मंदिर आम्ही पाहिलं आणि पहातच राहिलो. आजूबाजूची हिरवीगार शेती, मागे उभा असलेला हिरवागार डोंगर आणि खाली आलेले ढग या मंदिराची शोभा अजूनच वाढवत होते. मंदिरात असलेली श्री रामवरदायनी देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. रेखीव, आभूषणांनी सजलेली देवी, देवीचा हसरा चेहरा, सुंदर प्रभावळ हे सगळं आम्ही मनात साठवून घेतलं, आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

एकदा तरी खास करून पावसाळ्याच्या मौसमात भेट द्यावं असं हे  'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर'... 

नक्की भेट द्या. 







Saturday 13 August 2022

पत्र

पत्र 


हल्ली मोबाईल,Video Call आणि Chat च्या जमान्यात कोण कोणाला पत्र लिहून पाठवत...? 

नाहीच पाठवत कारण प्रगत तंत्रज्ञान; मनात आलं की आपण आपल्या माणसांशी संपर्क साधू शकतो. 

पण या काळातही जेव्हा आपल्या माणसांचं पत्र आपल्याला मिळत तेव्हा ते वाचतानाची मजा काही औरच असते. 

हल्ली लांब असलेल्या भावाला बहीण राखी पाठवते तेव्हा त्या सोबत चॉकलेट्स, ग्रीटिंग सुद्धा पाठवते. पण माझी आत्ते राख्यांसोबत नेहेमीच एक पत्र लिहून पाठवते. खूप छान वाटतं ते पत्र वाचायला. पूर्वीच्या काळी फोन एवढे नव्हते तेव्हा अशी खुशालीची पत्र पाठवली जायची पण आजही आटते आवर्जून राख्यांसोबत पत्र लिहून पाठवते. 

आता आपल्या मनात आलं की आपण आपल्या माणसांशी बोलू शकतो, कितीही लांब असली तरी Video Call द्वारे पाहू शकतो. पण या पात्रांची मजा वेगळीच आहे. पूर्वीच्या काळी अशी खुशालीची पत्र लिहिली जायची मग त्या पात्राच्या उत्तराची वाट पाहिली जायची. मनातील भावना एका कागदावर उतरायच्या आणि लांब असलेल्या आपल्या माणसांपर्यंत त्या पोहोचायच्या. आपल्या माणसाला पत्र लिहिण्यात आणि त्या पात्राच्या उत्तराची वाट बघण्यात पण एक गम्मत असेल ना..?

आणि हल्लीच्या काळात भांडण कशा वरून होतात तर माझा मेसेज का read नाही केला.. read करून reply का नाही दिला... 

असो... 

तर तुम्ही सुद्धा कधीतरी आपल्या माणसांना अशी पत्र लिहून पाठवा, कागद पेन घ्या आणि लिहा आपल्या मनातील भावना त्यावर आणि पाठवा आपल्या माणसांना. फोन मधले मेसेज कधी ना कधी Delete होतील पण आपल्या माणसांनी पाठवलेली ही पत्र कायम आपल्या सोबत राहतील...❤️



Thursday 16 December 2021

असाही एक प्रवास...

असाही एक प्रवास...  

'असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो'...

पण काही वेळा माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आणि मग त्याचा प्रवास सुरु होतो 'जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा'...  


जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं ना,'अगं तू बदललीचं नाहीस गं', किंवा 'तू अजून आहेस तशीच आहेस गं',

तेव्हा आपण समजावं की आपण अजून आयुष्यात आहोत तिथेच आहोत.   

खरंच..!! माणसाने बदलावं, वेळेनुसार, परिस्थितीनुसार... बदलावं... तिथेच राहू नये. 

नक्कीच हा बदल सकारात्मक असावा. 


जसे आपल्या स्मार्ट फोन मधील Apps वेळेनुसार update होत असतात ना तसंच आपणही वेळेनुसार, परिस्थितीनुसार update व्हावं. 

आपले दोष स्वीकारून ते दोष कसे कमी करता येतील, दोष कसे घालवता येतील यावर काम करावं आणि स्वतःला बदलावं. 


आपल्या नेहेमीच्या वापरातील WhatsApp चं उदाहरण घ्या, आपण ते नेहेमी update नाही केला तर ते आपोआप बंद होत जोवर आपण ते update करत नाही. बंद व्हायच्या १४ दिवस आधी रोज notification येतं. आणि update नाही केला तर ते बंद होत. 

तसंच आपल्या आयुष्याचं असतं आपण स्वतःला आता update करायला हवं अशा notifications आपल्याला मिळत असतात त्या आपण ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःला update केला पाहिजे, नाहीतर आपला टिकाव लागण कठीण. 


Appsचं कशाला आपल्या निसर्गात सुद्धा खूप उत्तम उदाहरण आहे. साप... 

सापाच्या बाह्य पेशी जेव्हा मरू लागतात तेव्हा तो संपूर्ण त्वचा टाकून देतो अर्थातच कात टाकतो. साप जेव्हा कात टाकतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो. 

कात टाकत असताना सापाला प्रचंड वेदना होत असतात. त्याचाही हा एक प्रवासच असतो जुन्याकडून नव्याकडे जाण्याचा...  

तसंच आहे हो जुन्यातून नव्याकडे जातानाचा हा प्रवास थोडा वेदनादायी असू शकतो, पण हा प्रवास करा. थांबू नका. 


असा हा जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा प्रवास प्रत्येकाचा सुरु असतो. कधी कळत, तर कधी नकळत. 




 


 


Friday 22 October 2021

माझी आजी

 

माझी आजी

माझं आणि आजीचं नातं म्हणजे "तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना"....
आता आपलं जमणार नाही आणि आता मला करमणार नाही...😭
मी नेहमी गमतीत म्हणायचे तुझं माझ्यावर प्रेमचं नाही, पण जेव्हा मध्यरात्री माझ्या पायात cramps यायचे तेव्हा लगेच उठून 'ओम नमः शिवाय' म्हणत माझ्या पायाला तेल लावणारी, आणि मी शांत झोपल्यावर झोपणारी तू होतीस... 😭😪
गेले काही दिवस मला बरं नव्हतं म्हणून मी ४..५ दिवस एका खोलीतच होते (Don't worry कोरोना नव्हता) त्यामुळे तुझ्याशी काही बोलणंच झालं नाही, आणि मी बरी झाले तर तू डोळे मिटलेस ते उघडलेच नाहीस... 😭💔
शेवटचं बोलणंच नाही झालं आपलं, हे आता कायम मनात राहील... 💔😣
खरंच आपण आपल्या माणसांना किती गृहीत धरतो, समोर असताना वेळ काढत नाही आणि गेल्यावर दुःख करत बसतो... 🥺😢
काही चुकलं असेल तर माफ कर जिजी...🙏🏼😓

आमच्या घरी आलेलं कोणीही कधी रिकाम्या पोटी गेला नाही; फक्त माणसचं नाही तर दारात आलेली गाय सुद्धा कधी अशीच गेली नाही...
अशीही सगळ्यांचं हसतमुखाने ती स्वागत करणारी, सगळ्यांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारी माझी आजी... ❤️❤️❤️

ते खरंच बोलतात घरात एक तरी म्हातारं माणूस असावं, आपल्या रूढी-परंपरा शिकवायला, आधीच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीला द्यायला,काही चुकलं तर सांगायला, आपल्यावर प्रेम करायला एक तरी म्हातारं माणूस असावं...❤️❤️❤️

भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🏼😞

Saturday 5 September 2020

Sukh Mhanje Nakki Kay Asat

 सुख म्हणजे नक्की काय असतं !

Birthday Cake

'सुख' म्हणजे तेच जेव्हा आपली माणसं आपल्यासाठी काही तरी मनापासून करतं असतात.
काल माझा जन्मदिवस होता आणि माझ्या माणसांनी तो खूप सुंदर साजरा केला. Surprise Birthday Celebration Plan केलं होत सगळ्या भावंडांनी.
माझ्या बहिणींनी खूप सुंदर केक केला, भावांनी आणि मामाने Decoration केलं, तर आई आणि वहिनीने स्वादिष्ट पदार्थ केले, आणि बाबांनी माझ्या आवडीचे गुलाबजाम आणले.
हे सगळं planning केलेलं माझ्या वहिनीने. वाढदिवसाच्या २ दिवस आधीपासून माझ्या नकळत तीचं Birthday planning सुरु झालं. सगळ्यांना मेसेज करून कल्पना दिली कोणी कसं काय करायचं हे ठरवलं. आणि वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी मी देवळात आणि इतर काही कामांसाठी माझ्या बहिणीसोबत बाहेर गेले तेव्हा सगळ्यांना घरी बोलावून पटापट सगळी तयारी केली. आणि घरी येताच हे सुंदर Surprise मिळालं. तेव्हाच्या भावना खरं तर शब्दात व्यक्त नाही करता येत आहेत. पण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रेमाने केलंय हीच भावना खूप सुखावणारी आहे.

खरंच..! बाहेर हॉटेल मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा, बाहेर कोणाला ऑर्डर देण्यापेक्षा जेव्हा आपण आपल्या माणसासाठी, त्याच्या आवडीचा विचार करून काहीतरी करतो ना तेच खरं Celebration. जरी ते Professional Decorator एवढं perfect नसलं तरी आपल्या माणसांनी प्रेमाने केल्यामुळे खूप सुंदर असतं, त्यात प्रेम असतं. आणि हे सगळं Planning करताना, Decoration करताना जी धमाल येते ना ते काही औरच...
हे करूया, असं करूया, तिला हे आवडेल, असं केलं तर ती जास्त खुश होईल, हा फुगा इथे असा लावूया, केकची design अशी करूया, हे कारण काढून तिला बाहेर पाठवूया, मग इकडे घरी तयारी होई घराबाहेर कसं गुंतवून ठेवता येईल हे जे काही discussion होत ना त्याची मजा काही औरच...

खरंच ते म्हणतात ना तुम्ही समोरच्याला जेवढा जीव लावाल समोरचासुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करेल...
अशी प्रेम करणारी माणसं आयुष्यात असल्यावर आणि काय हवं! 😇

Monday 20 July 2020

OMT Glimpse

 फायनलकडे वाटचाल #O.M.T.



काल (१९ जुलै रोजी) OMT चा तिसरा आठवडा म्हणजेच सहावी मॅच झाली. आणि आता उत्सुकता लागली आहे ती फायनलची.

खरंतर पहिल्या आठवड्यापासूनच इतके दमदार Performance बघायला मिळाले की, आता शनिवार-रविवार कधी येतोय आणि रात्रीचे ९ कधी वाजतायत असं व्हायचं. विषय सुद्धा इकडे अप्रतिम असायचे की या वर ही सगळी मंडळी काय सादर करणार याची उत्सुकता देखील असायची.

पहिल्या दोन भागांचे विषय होते- 'Television' आणि 'स्पर्श' 
'Television' या विषयावर Television evolution, Televisionवर येणाऱ्या मुंग्या, Television मुळे जीवनात झालेले बदल, कार्टून्सचा लहान मुलांवर होणार परिणाम, पत्रकारितेमध्ये होणारे बदल असे विविध विषय हाताळले गेले.
'स्पर्श' या विषयावर अगदी मायेच्या स्पर्शापासून ते अगदी पोटासाठी एका स्त्रीला सहन करावा लागणार त्याचा स्पर्श, एवढंच काय तर काकस्पर्श ते वाघाच्या पंजाचा स्पर्श इतक्या सुंदर रीतीने मांडला गेला कि तो प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला.


त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातील भागांचे विषय होते- 'Picture अभी बाकी है' आणि  'लाभले आम्हास भाग्य'
'Picture अभी बाकी है' या विषयावर कीर्तन, निरूपण, भारूड, नृत्य या द्वारे या विषयाची मांडणी करण्यात आली. या दिवशीचा अतिशय सुंदर आणि डोळे पाणवणारा performance होता तो 'गौरी नलावडे' यांचा. यात त्यांनी एक तरुण पत्नी साकारली जी आपल्या आयुष्याच्या शेवटाकडे आहे आणि ती आपल्या पतीला सांगतेय कि आपल्या दोघांच्या गोष्टीचा जरी शेवट होत असला तरी 'Picture अभी बाकी है'. त्या ४ मिनिटांमध्ये त्यांनी खिळवून ठेवलं; नाका मध्ये ती ऑक्सिजनची तोटी, खोल गेलेले डोळे, background ला तो ECG  machine चा आवाज, वातावरणात निर्माण झालेली भयानक शांतता आणि शेवट एका भावनिक गाण्याने. कमाल..!!
'लाभले आम्हास भाग्य'  असं ऐकलं कि ओघाने 'बोलतो मराठी' असं येतच. पण या विषयाला अनुसरून सुद्धा खूप सुंदर सादरीकरण पाहायला मिळाली.  'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे होतेच पण 'लाभले आम्हास भाग्य'  स्त्री जन्माला आले, 'लाभले आम्हास भाग्य' महाराष्ट्रात जन्माला आलो, 'लाभले आम्हास भाग्य'  एक माणूस म्हणून जन्माला आलो, 'लाभले आम्हास भाग्य' या technologyचा वापर करून जगभराशी जोडले गेलो, 'लाभले आम्हास भाग्य' इतके थोर रंगकर्मी आपल्याला लाभले. या विषयावर सर्वांनी इतके सुंदर सादरीकरण केले कि तिथे उपस्थित प्रेक्षकांच्या मनात नक्कीच आले असेल 'लाभले आम्हास भाग्य' OMT मध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होता आलं. 

तिसऱ्या आणि निर्णायक अशा आठवड्याचे विषय होते 'तळ्यात मळ्यात' आणि 'दे टाळी'
'तळ्यात मळ्यात' म्हटलं कि आठवतो आपला लहानपणीच खेळ 'तळ्यात की मळ्यात' अर्थात द्विधा मनस्थिती. एका नेत्याची कोणत्या पक्षात जाऊ हा विचार करतानाची  द्विधा मनस्थिती, आई-वडील वेगळे होताना मुलांची होणारी द्विधा मनस्थिती, नास्तिक कि आस्तिक हि द्विधा मनस्थिती, Transgender लोकांची द्विधा मनस्थिती, इतकंच काय तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होणारी द्विधा मनस्थिती खूप छान पद्धतीने मांडण्यात आली. दुसऱ्या आठवड्यात भावनिक Actने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या 'गौरी नलावडे' यांनी या वेळी हसवून हसवून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. एक नुकतंच लग्न झालेली नवरी जिचं लग्न एका चाळीमधील मुलाशी झालं आणि तिथे असणारे कॉमन टॉयलेट्स आणि एवढ्या रात्री एकटीने तिथे कसे जायचे, जाऊ की नको जाऊ अशी हि एक द्विधा मनस्थिती इथे मांडली.   

 'दे टाळी' म्हटलं की आपण टाळी देऊन मोकळं होतो, पण या विषयावर पण एवढे सुंदर सादरीकरण होऊ शकतात हे काल कळलं मला. या मध्ये टाळ्यांचे वेगवगेळे प्रकार खूप छान दाखवण्यात आले, 'टाळीचा शोध कसा लागला असेल?' याची कल्पना करून विनोदी पद्धतीने ते मांडण्यात आले, रंगमंच आणि प्रेक्षकांच्या टाळ्या यांचं एक अनोखं नातं सादर करण्यात आलं, एका नृत्यामध्ये किती सुंदर टाळीचा वापर होतो ते सादर करण्यात आलं, इतकंच काय तर siachen मध्ये लढताना आपण जिवंत आहोत हे सांगण्यासाठी आपल्या साथीदाराला दिलेली ती टाळी यावर सुद्धा सादरीकरण करण्यात आले.

खरंच...!!! आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशाप्रकारे हि सर्व मंडळी या विषयांवर सादरीकरण करायचे. प्रत्येक आठवड्यात त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्तच काही देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि आता बघता बघता फायनल जवळ पोहचलो. अत्यंत चुरशीच्या अशा लढाईत 'मसाला पान' आणि दोन फुल्या तीन बदाम' हे संघ फायनलला पोहचले. येत्या २५ आणि  २६ जुलै २०२० रोजी या दोन संघात विजेते पदासाठी लढत होईल.   
तुम्हाला सुद्धा फायनलमध्ये सहभागी व्हायचे असेल तर लगेच तिकीट बुक करा https://www.ticketkhidakee.com/ येथे.

विविध प्रकारची सादरीकरण आणि कलेच्या विविध पैलूंनी सजलेले हे OMT चे पहिले पर्व शेवटाकडे जातंय. दुसरे पर्व सुद्धा लवकर यावे हीच इच्छा.

कारण घरात बसलो म्हणून का हो, आडतंय आमचं खेटर...
अभिव्यक्त होण्यासाठी आता 'Online माझं Theatre'

Subak आणि Wide Wings Media संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.


(OMT म्हणजे नक्की काय आहे आणि OMT मधील पहिल्या भागाविषयी काही >> https://richajk.blogspot.com/2020/07/online-mazha-theatre_5.html)

Sunday 5 July 2020

Online Mazha Theatre

Online माझा Theatre


Online माझा Theatre
#OMT म्हणजेच Online माझा Theatre...

मराठी रंगभूमीवर होत असलेला एक अनोखा आणि भन्नाट प्रयत्न.

काल म्हणजे ४ जुलै रोजी या #OMT चा पहिला भाग सादर झाला. ज्यामध्ये कोणतेही नाटक, एकांकिका किंवा दीर्घांक  दाखवला गेला नाही तर मराठी रंगभूमीवर काम करणारे अनुभवी तसेच नवोदित कलाकार एका दिलेल्या विषयावर Live परफॉर्म करत आहेत. ते सुद्धा आपापल्या घरातून zoom द्वारे.

ही एक स्पर्धा आहे जी ४ संघांमध्ये लढली जात आहे आणि प्रत्येक संघात ४ स्पर्धक आणि प्रत्येक संघाचे कॅप्टन्स आहेत. आणि या स्पर्धेचे  परीक्षण करण्यासाठी मराठी मनोरंजन क्षेत्रातील ३ दिग्गज कलाकार चंद्रकांत कुलकर्णी, वंदना गुप्ते आणि अश्विनी भावे हे आहेत.

(या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी Online Mazha Theatre - OMT किंवा Wide Wings Media या पेजवर भेट द्या. )

कालचा पहिलाच भाग आणि विषय होता Television. आणि या विषयावर परफॉर्म करण्यासाठी आमने-सामने होते २ संघ 'घेऊन टाक' आणि 'वल्ली's'.

स्पर्धक सादरीकरण करताना
'Television या विषयावर काय बरं परफॉर्म करणार ही मंडळी?'  या विचारात असतानाच सुरवात झाली,
'शुभांकर तावडे' यांच्या दमदार अशा Mime Act ने ज्यात त्यांनी 'Television evolution' दाखवले आणि एका पाठोपाठ एक असे कमाल परफॉर्मन्स यायला सुरवात झाली.
'विकास पाटील' यांनी Television पूर्वीच जीवन आणि Television आल्यावर जीवनात झालेले बदल हे एका कवितेमार्फत सादर केले.
'नंदिता पाटकर' यांनी अभिराम भडकमकर लिखित 'At Any Cost' या पुस्तकातील एक खिळवून ठेवणारा परिच्छेद सादर केला.
'हेमांगी कवी' यांनी पूर्वी Television वर येणाऱ्या 'मुंग्या' ते आता इंस्टाग्राम वर IGTV वर येणाऱ्या मुंग्या अशा या Television वरील मुंग्यांचा प्रवास  खूप अप्रतिमरित्या त्यांच्या खास शैलीत सादर केला.
'भार्गवी चिरमुले' यांनी news channel मध्ये होणारे बदल खूपच सुंदररित्या दाखवले; सुरवातीच्या काळात होणारी पत्रकारिता आणि आता बदलत जाणारी पत्रकारिता यावर भाष्य करणारा हा परफॉर्मन्स ठरला आजचा 'बेस्ट परफॉर्मन्स'.
'आशुतोष गोखले' यांनी एका इंग्रजी कवितेचे मराठीमध्ये अनुवाद करून हल्लीच्या मुलांना कार्टूनचे लागलेले वेड आणि त्यांना कार्टून पाहण्याच्या या वेडा पासून कसं मुक्त करावं यावर भाष्य करणारी कविता खूप सुंदर सादर केली.
'ऋतुराज शिंदे' यांनी एक RAP सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
आणि या भागाचा शेवट झाला 'नेहा शितोळे'च्या भावनिक पत्राने.

अशा रीतीने  MIME ACT, अभिवाचन, कविता सादरीकरण,RAP, पत्रलेखन अशा सुंदर अशा कलेच्या वेगवेगळ्या पैलूंनी सजलेला पहिला भाग पार पडला, आणि या अनोख्या अशा या अनोख्या प्रयोगात मलाही प्रेक्षक म्हणून सहभागी होता आलं, याचा मला खूप आनंद आहे.

खरं तर 'हा एक नवीन उपक्रम काय आहे पाहूया तर!' असं म्हणत फक्त कालच्या भागाचे मी तिकीट काढले. पण कालचा पहिला भाग इतका कमाल आणि पैसा वसूल होता कि मी लगेच Season Pass काढला. आणि आता पुढच्या भागांसाठी मी उत्सुक आहे. तुम्ही सुद्धा या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचे भाग होऊ इच्छित असाल तर लगेच तिकीट बुक करा https://www.ticketkhidakee.com/ येथे.

कारण घरात बसलो म्हणून का हो, आडतंय आमचं खेटर...
अभिव्यक्त होण्यासाठी आता 'Online माझं Theatre'

खूप खूप धन्यवाद...!! Subak आणि Wide Wings Media