Friday 20 September 2019

जतन कशाचे करावे..?

जतन कशाचे करावे..? 


आजच माझ्या वाचनात आलं कि, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी गुजरात येथील वडनगर स्टेशन वर जिथे लहानपणी चहा विकला ती जागा म्हणे 'पर्यटन स्थळ' करणार आहेत. त्या Tea stall च जतन करणार आहेत म्हणे.  ठीक आहे करा जतन, ज्यामुळे चहा वाला पंतप्रधान झाला(झाले), गरिबीतून वर आले, चांगली गोष्ट आहे.

पण मग आमच्या महाराजांच्या गड-किल्यांचं काय..?
हजारो मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेले गड-किल्ले जतन करायला हवेत कि त्यांचे Heritage hotel मध्ये रूपांतर व्हायला हवं..?

जर मोदींनी जिथे 'फक्त चहा विकला' जी जागा मूळ स्वरूपात जतन केली जात आहे, वडनगर स्टेशन आणि आजूबाजूचा काही परिसर काही कोटी रुपये खर्च करून पर्यटन स्थळ केले जात असताना मात्र तो Tea stall आहे त्या स्थितीत जतन केला जाणार आहे...
तर मग महाराजांच्या साथीने हजारो मावळ्यांनी प्राणाची पर्वा ना करता स्वराज्यात आणलेले गड-किल्ले, आहे त्या स्थितीत जतन केले जाऊ शकत नाहीत..?
त्यासाठी त्यांना Heritage hotel चा दर्जा देणं खरंच गरजेचं आहे...?
       
संदर्भ:

https://www.youtube.com/watch?v=RfTA6NIFKq0

https://www.ndtv.com/india-news/in-gujarat-stall-where-pm-modi-once-sold-tea-to-be-made-tourist-spot-2094580

https://www.indiatoday.in/lifestyle/travel/story/pm-narendra-modi-sold-tea-at-this-vadnagar-stall-in-gujarat-now-it-will-be-a-tourist-spot-1594623-2019-09-02

No comments:

Post a Comment